
गेल्या दीड शतकात नाशिक ने अनेक प्रगतीची पर्वते गाठली आहेत. कित्तेक गोष्टीच्या प्रगतीचे साक्षीदार आपले नाशिक शहर आहे . शून्यापासून शंभरी गाठणारे आणि त्याही पुढे वाटचाल करत असणारे अनेक आस्थापने नाशिकमध्ये आहे. या अस्थापनांनी केवळ प्रगतीच केली नाही तर नाशिक सोबत अमूल्य असं नातं निर्माण केला आहे.
यातलेच एक दुकान म्हणजे ‘कोंडाजी चिवडा’ कोंडाजी चिवड्याचा इतिहास बघता हा चिवडा केवळ खाद्य पदार्थ राहिलेला नसून नाशिकची ओळख बनलेला आहे.नाशिकरांसाठी चिवड्याचा व्याख्या एकच ती म्हणजे ‘कोंडाजी चिवडा’ बाहेरगावचा माणूस नाशिक मध्ये पर्यटनासाठी आला तर नाशिकचा रहिवाशी त्याला “कोंडाजी चिवडा” घेतल्याशिवाय जाऊ नका असे आवर्जून सांगतो”. इतकेच नाही तर,मूळ नाशिकचा रहिवासी बाहेरगावी जाताना नाशिक कडची भेट म्हणून कोंडाजी चिवडा घेऊन जातो. अश्या प्रकारचा विश्वास कोंडाजी चिवड्याने गेली १०२वर्षे निर्माण केला व टिकवून ठेवला आहे .
१९२०साली चिवड्याची एक नवीन ओळख निर्माण करून कोंडाजी चिवड्याचा प्रवासाला सुरुवात झाली. कोंडाजी गुणाजी वावरे यांनी त्याकाळी आपली सरकारी नोकरी सोडून या व्यवसायाला सुरुवात केली. कोंडाजी वावरे हे मूळ नाशिकचेच रहिवासी असून श्री रामाचे निस्सीम भक्त होते. रोज सूर्योदयापूर्वी गोदा काठी जाऊन स्नान करून काकड आरतील जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांचे कुटुंब अतिशय मोठे असल्याने शाळेत एकत्र कुटुंब पद्धतीसाठी त्यांच्या कुटुंबाचे उदाहरण दिले जायचे. कोंडाजी वावरे यांनी आपले मोठे कुटुंब सांभाळून व्यवसाय पुढे नेला. नोकरी सोडल्या नंतर एक महिन्याने त्यांना आपल्या घरी बनत असलेला चिवडा विकण्याची कल्पना सुचली. व्यवसायाच्या सुरवातीच्या काळात टोपलीत चिवडा घेऊन कोंडाजी वावरे हे रस्त्यावर चिवडा घेऊन विकायचे . काहीही झाले तरी आपला चिवडा लोकांच्या पसंतीस उतरला पाहिजे असा ध्यास त्यांनी मनात घेतला होता.
कोंडाजी चिवडा यांच्या यशाची पहिली पायरी म्हणजे रस्त्यावर विकला जाणारा हा चिवडा दुकानात विकला जाऊ लागला.कोंडाजी वावरे यानी नाशिक मधील भद्रकाली येथे ‘ कोंडाजी चिवडा ‘ दुकानाची स्थापना केली. हेच दुकान अजूनही तमाम नाशिककरांना सेवा पुरवत आहे.
कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना कोंडाजी वावरे यांनी कोंडाजी चिवडा या व्यवसायचे स्वप्न बघितले, साकारले आणि प्रगती पथावर नेले. हा व्यवसाय प्रगतीच्या वेगाने पुढे नेण्याची जिद्द व तयारी जशी कोंडाजी वावरे यांच्या मध्ये होती तशीच त्यांच्या पुढील पिढ्यांनमध्ये होती………आजही आहे. कोडाजी वावरे यांच्या मुलांना कुस्तीची आवड होती ; ही आवड जपुन त्यांनी या व्यवसायात मोलाचे योगदान दिले. कोंडाजी वावरे द्वितीय चिरंजीव मुंबई मध्ये पी.एस.आय होते.
या व्यवसायचे धुरा समस्त वावरे कुटुंबियांनी उत्कृष्टरित्या सांभाळली. सद्य स्थितीत हा व्यवसाय कोंडाजी वावरे यांची चौथी पिढी विशाल वावरे व त्यांचे भावंडं सांभाळत आहे. फक्त भद्रकाली पासून सुरू झालेल्या या दुकानाच्या आज नाशिक मध्ये अनेक ठिकाणी शाखा आहेत. कोंडाजी चिवड्याची ख्याती केवळ नाशिक पर्यंतच मर्यादित नसून संपर्ण भारत व भारत बाहेर ही पसरलेली आहे. या चिवड्याच्या चवीची दखल भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील घेतली होती.गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या भगिनी उषा मंगेशकर जेव्हा कधी वणीला जातात, कोंडाजी चिवडा घेतल्या शिवाय परत जात नाहीत.या सुरुवातीला फक्त पोह्याचा चिवडा विकला जायचा पण आता चिवड्याचे अनेक प्रकार आलेले आहे जसं की कोंडाजीचा स्पेशल चिवडा, विशाल भेळ, मखमली चिवडा आणि मक्याचा चिवडा. या प्रत्येक चिवड्याची वेगळी अशी खासियत आहे.
कोंडाजीचा स्पेशल चिवडा हा नाशिकचा चिवडा म्हणून देखील ओळखला जातो. यामध्ये प्रामुख्याने कांदा व लसूण यांचा वापर केला जातो.मखमली चिवडा हा तळलेल्या पोह्यांपासून तयार केला जातो, यामध्ये भरभरून सुख्यामेवाचा वापर केला जातो.विशाल भेळची ॲमेझॉनवर युनिक सेल प्रोडक्ट म्हणून नोंद झाली आहे. कोंडाजी चिवडा यांनी अनेक कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या आयुष्याला त्यांनी योग्य दिशा दिली आहे. व्यवसायाचा वाढता विस्तार बघता तसेच लोकांची पसंतीकडे बघता उत्पादन करण्याची जागा कमी पडत असल्यामुळे त्यांनी गंगापूर येथे नवीन अत्याधुनिक कारखाना उभारण्याचे योजिले आहे. आजच्या ऑनलाईन व्यवसायाच्या काळात त्यांनी आपली स्वंतत्र अशी वेबसाईट बनविली आहे “WWW.KODAJICHIVADA.IN” त्याचबरोबर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि शॉपी यासारख्या ऑनलाईन मार्केटमध्ये देखील कोंडाजी चिवडा विकला जातो.
तब्बल १०२ वर्ष नाशिककरांच्या जिभेवरची चव टिकावून ठेवण्यासाठी कोंडाजी वावरे यांच्या पिढ्या अथक प्रयत्न करीत व करीत राहतील. पिढ्या बदलत राहतील परंतु कोंडाजी चिवड्याचा स्वाद तसाच राहील.